Posts

नांगरणीशिवाय शेती – प्रताप चिपळूणकर

प्रताप चिपळूणकर हे गेली ४० वर्षे शेती करत आहेत. शेतीविषयातले ते पदवीधर आहेत, आणि त्यांचा सूक्ष्मजीवशास्त्राचाही अभ्यास आहे. प्रामुख्याने ऊस आणि भात ही पिके ते घेतात. त्यांचा अभ्यास आणि शेतीतले अनुभव या दोन्हीच्या आधारे नांगरणीशिवाय शेती पद्धतीविषयी त्यांनी या पुस्तकात माहिती दिलेली आहे. पुस्तकातील लेख आधी ऍग्रोवनमध्ये लेखमालिका स्वरूपात प्रसिद्ध झालेले आहेत, त्यामुळे काही ठिकाणी द्विरुक्ती दिसते, पण संवर्धित शेतीविषयी बरीच माहिती या पुस्तकामधून मिळते. हे पुस्तक आणि प्रताप चिपळूणकरांचं एक व्याख्यान या दोन्हीमधून मिळालेली / मला समजलेली माहिती इथे एकत्र दिली आहे. * (Resource conservation technology) संवर्धित शेतीचा भर प्रामुख्याने गरजेपुरती नांगरणी किंवा नांगरणीशिवाय शेती यावर असतो. माणसाच्या किंवा शेतीच्या इतिहासामध्ये नांगराचा शोध, पशूंकडून नांगरणी, लाकडाऐवजी लोखंडी नांगराचा वापर हे प्रगतीचे टप्पे मानले गेलेले आहेत. पूर्वमशागत जितकी चांगली, जितकी खोल नांगरट तितकं उत्तम पीक हा विचार इतक्या काळापासून रुजलेला आहे. नांगरणी कमी करणे हा विचार विसाव्या शतकात प्रथम पुढे आला. रासायनिक खतांचा व

Love - Hate - Love

Image
पावसाळ्यात टेकडीवर हा केना खूप वेळा पाहिलाय. त्याच्या गोड दिसणार्‍या निळ्या – जांभळ्या रंगाच्या फुलांचे कौतुकाने फोटोही काढलेत भरपूर. नंतर मग मैत्रिणीकडून समजले की ही एक रानभाजी आहे, ओडिशामधले आदिवासी याची भाजी खातात. केन्याविषयीचं माझं प्रेम अजून जरासं वाढलं मग. पण मग शेतीची शाळा सुरू झाली. पावसाळा सुरू झाला, आणि सगळं शेत केन्याने भरून गेलं! “इथलं तण वेळीच काढा, नाहीतर छातीभर उंचीचं रान माजतं दर वर्षी. सापही भरपूर आहेत. त्यामुळे तण उगवून आलं, की नांगर फिरवायचा. पुन्हा एकदा तण उगवून येईल, पुन्हा नांगर फिरवायचा. त्यानंतर परत फारसं तण उगवून येणार नाही” असा जाणत्यांचा सल्ला मिळाला. शेतात ट्रॅक्टर घालायचा नाही असा शक्यतो विचार होता. पॉवर टिलर मिळवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. शहरातल्या शेतात बैलाचा नांगर फिरवायला बैल सुद्धा मिळाले, पण नांगर नव्हता. त्यामुळे पाऊस चांगला सुरू झालाय, शेत नांगरलेलं नाही, तण माजतंय, आणि काहीच पेरलेलं नाही अशी अवस्था झाली. आपण हाताने तण काढावं, का मजूर लावून काढून घ्यावं, आणि तण काढलं, तरी माती मोकळी कशी करणार असे सगळे प्रश्न. कम्पोस्टच्या

शेतीची शाळा ३

शेतीची शाळा २ द्विदल धान्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठींमध्ये र्‍हायझोबियम जिवाणू असतात. या जिवाणूंचं आणि झाडाचं symbiotic परस्परावलंबन आहे. झाडं या जिवाणूंना कर्ब पुरवतात, तर हे जिवाणू हवेतल्या नायट्रोजनचं स्थिरीकरण करून झाडांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असणारा नत्र जमिनीमध्ये उपलब्ध करून देतात, आणि ही झाडं जमिनीतच कुजवल्यामुळे जमिनीतला सेंद्रीय कर्बही वाढतो. त्यामुळे जमिनीचा कस सुधारतो. अशा प्रकारे जमिनीचा कस सुधारण्यासाठी मुद्दाम झाडं लावण्याला हिरवळीचं खत म्हणतात. कम्पोस्ट करून झाल्यावर चांगला पाऊस झाला आणि जमिनीमध्ये ओलावा आला, म्हणजे हिरवळीचं खत म्हणून ताग पेरा असा सल्ला आम्हाला जाणकारांनी दिला होता. इतके दिवस नुसतं ओल्या – कोरड्या कचर्‍यावर पाणी मारल्यावर खरोखरच काही पेरायचं ही कल्पनाच सुखावणारी होती. त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर जरा घाईनेच तागाची पेरणी केली.  तागाचं बियाणं पेरलं, आणि पावसाने दडी मारली. पावसाची वाट बघणं हा आपल्याकडे शेतकरी होण्यातला अविभाज्य भाग आहे, तर ते काम आमचं सुरू झालं. कम्पोस्ट सॅंडविचवरची जमीन चांगली तयार झालेली होती आणि ओलावा धरून

शेतीची शाळा २

Image
शेतीची शाळा १ शेतीच्या शाळेची सुरुवात पाच गुंठे जमीन वापरायला घेऊन करायची असं ठरलं. ही जमीन विज्ञान आश्रमाच्या आवारातलीच. त्यामुळे तिला कुंपण होतं, चोवीस तास कुणीतरी तिथे असणार होतं. रस्ता, वीज, पाणी (मनपाचं!) मिळवण्याची कुठलीच अडचण नव्हती. फक्त पाणी टंचाई झाली तर पाणी वापरावर काही बंधनं निश्चितच असणार होती. जमीन तशी पडीक होती, ती लागवडीयोग्य करण्यापासून सुरुवात करायची होती. त्यामुळे पहिलं काम होतं तिथला कचरा काढण्याचं. बांधकामाचा राडारोडा, दारूच्या बाटल्या असं वाट्टेल ते होतं तिथे. ते आधी साफ करून घेतलं. त्यानंतर मातीची तपासणी केल्यावर लक्षात आलं, की या जमिनीमध्ये सेंद्रीय कर्ब खूप कमी आहे, नत्राचीही कमतरता आहे. म्हणजे आता जमिनीचा कस सुधारायला हवा. जमिनीचा कस सुधारण्यासाठी म्हणून तिथे कम्पोस्टिंग करता येईल असं वाटलं. कम्पोस्टिंग तसं थोडंफार माहित होतं, पण ते घरच्यापुरतं, किंवा सोसायटीच्या ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यापुरतं. एवढ्या जमिनीचा कस वाढवायचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर सगळं व्हायला हवं होतं. आणि आम्हाला शेती शिकायची होती, त्यामुळे शेतकर्‍याला परवडतील अशा मार्गानेच कस

शेतीची शाळा १

एक जुनंच खूळ पुन्हा नव्याने डोक्यात घेतलंय. आपलं एक शेत असावं असं दिवास्वप्न मी कित्येक वेळा पाहिलंय, आणि आपल्या गेल्या काही पिढ्यांचा शेतीशी काहीही संबंध नाही, यातलं आपल्याला ओ की ठो कळत नाही, शेती करणारे परवडत नाही म्हणून सोडताहेत आणि दुसरा पर्याय असताना शेती करणं म्हणजे भिकेचे डोहाळे इ. इ. सगळं ऐकून समजून शेती शक्य नाही म्हणून हा विचार झटकून टाकायचा प्रयत्नही केलाय. पण तीन महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण, माऊच्या सखीची आई याच खुळाने अशीच झपाटलेली असतांना, एकेकटीने हे शक्य नाही, पण आपण मिळून काही करू शकतो, मज्जा येईल करायला!” असं दोघींच्या लक्षात आलं, आणि आम्ही आपल्याला रोज जाऊन कसता येईल अशी जमीन हवी म्हणून शोधायला लागलो. घरापासून एक – दीड तासाच्या अंतरातली जमीन घ्यायची, आणि आपण स्वतः कसायची अशी साधारण डोक्यात कल्पना घेऊन शेतं बघत हिंडायला सुरुवात झाली. अजून एक मैत्रीण पण आमच्यात सामील झाली. घरापासून एक – दीड तासात गाडीने पोहोचता यायला हवं, शेतापर्यंत रस्ता हवा – कुणाच्या बांधावरून जाणं आणि त्याचे वाद परवडणारे नाहीत, पाणी आणि वीज ऍक्सेसिबल पाहिजे हे सगळे निकष लावल्यावर मिळणारी जमीन प

The One Straw Revolution – Masanobu Fukuoka

शेतकरी आणि तत्त्वज्ञ मासानोबू फुकुओका हा सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, ZBNF अशा सगळ्या शेतीपद्धतींच्या मुळाशी असणारा बाप माणूस आहे. जपानी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या फुकुओकांचा सूक्षमजीवशास्त्राचा आणि शेतीशास्त्राचा अभ्यास होता. झाडांवरच्या रोगांचा अभ्यास करणारा संशोधक म्हणून त्यांनी करियरची सुरुवात केली. पण पुढे पाश्चात्य / आधुनिक शेतीशास्त्राचा मार्ग चुकतो आहे याविषयी त्यांची खात्री झाली, आणि संशोधकाच्या नोकरीचा राजिनामा देऊन फुकुओका घरच्या शेतीकडे वळले. १९३८ पासून त्यांनी सेंद्रीय लिंबूवर्गीय फळबागांचे प्रयोग आणि निरीक्षणे करायला सुरुवात केली, आणि यातून हळुहळू त्यांचा नैसर्गिक शेतीचा विचार विकसित झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर १९४७ पासून त्यांची सेंद्रीय भातशेतीही सुरू झाली. त्यांनी “One Straw Revolution” १९७५ मध्ये लिहिलं. डोळस प्रयोग आणि इतका प्रदीर्घ अनुभव या पुस्तकाच्या मागे आहेत, त्यामुळे त्याचं हे पुस्तक म्हणजे जगभरातल्या नैसर्गिक शेतीवाल्यांचं बायबल समजलं जातं. खरं म्हणजे हे पुस्तक घेऊन कितीतरी वर्षं झाली. ते वाचायलाही सुरुवात केली, पण काहीतरी बोचत होतं वाचतांना, पुस्तक काही मी